Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

शाळा उन्नती अभियान





जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
आनंदी, स्वच्छंदी शिक्षणासाठी सध्या फिनलॅँडचं उदाहरण दिलं जातं. गेली चाळीस-पन्नास वर्षे अथक परिश्रम करून फिनलॅँडने शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी बनवली आहे. पण ते पाहण्यासाठी फिनलॅँडला जायची गरज नाही. हे असे कौतुक आपल्या जालना जिल्ह्य़ातही अवतरले आहे. गेले आठ महिने जालन्यात सुरू असलेल्या शाळा उन्नत अभियानामुळे तिथल्या जिल्हा परिषद शाळांचा कायापालट झाला आहे. बदलाच्या प्रक्रियेच्या जाणिवेने थरारून गेलेले शिक्षक आणि त्यात सहभागी झालेले विद्यार्थी हे चित्र आपल्याच राज्याच्या एका जिल्ह्य़ात शक्य झाले आहे. शिक्षण आनंददायी करण्यासाठी इतर कशापेक्षाही इच्छाशक्तीची गरज असते हे अधोरेखित करणाऱ्या या अभियानाविषयी-
शिक्षण आनंददायी असायला हवं याविषयी कुणाचंच दुमत नसतं, पण प्रत्यक्षात भरपूर विद्यार्थिसंख्या असलेले वर्ग, शैक्षणिक सुविधांचा, इच्छाशक्तीचा अभाव, घरचे अशैक्षणिक वातावरण, सगळ्याच पातळ्यांवर आलेले मरगळलेपण या सगळ्यामधून आनंददायी शिक्षण वजा होतं. केवळ आईवडील पाठवतात म्हणून मुलं शाळेत जातात, पण शाळेत रमत नाहीत. हळूहळू शाळागळती सुरू होते.
मूल शाळेत रमावं, शिक्षण आनंददायी व्हावं, यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले आहेत. शिक्षणाच्या प्रयोगशाळा ठराव्यात अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत, पण या शाळा अगदी थोडय़ा ठिकाणी असतात. सगळी मुलं या शाळांचा, तिथल्या शैक्षणिक उपक्रमांचा, प्रयोगांचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रायोगिक शाळांमधून शिकलेल्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वेगळी ठरते. सर्वसामान्य शाळांमधून शिकलेल्या मुलांची गुणवत्ता त्यांच्यापेक्षा वेगळी ठरते. म्हणूनच गरज असते ती कोणतेही प्रयोग सर्वसमावेशक असण्याची. एकाच वेळी सर्वाना सामावून घेणारे प्रयोग सर्वसामान्य शाळांच्या पातळीवर झाले, तर ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांना त्यांचा लाभ मिळेल आणि मोठय़ा प्रमाणात बदल घडतील. सगळ्यांसाठीच शिक्षण आनंददायी ठरेल.
आपल्याकडचे भरगच्च वर्ग बघितले तर मोठय़ा स्वरुपात शैक्षणिक प्रयोग ही गोष्ट अशक्य वाटते ना?
पण जालना जिल्ह्य़ातल्या शिक्षकांनी नेमकी हीच गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यासाठी निमित्त ठरलं आहे ते शाळा उन्नती अभियान. ऑगस्ट २०१२ पासून जालना जिल्ह्य़ात सुरू असलेल्या या अभियानामुळे जिल्हा परिषदांच्या शाळा एकदम बदलून गेल्या आहेत.
शैक्षणिक उपक्रमांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्य़ाने आजपर्यंत राज्याला स्वाध्यायपुस्तिका, बालोद्यान, गंमतशाळा यांसारखे दर्जेदार उपक्रम दिले. असाच या शैक्षणिक वर्षांतला जालना जिल्हा परिषदेचा उपक्रम, ‘शाळा उन्नती अभियान१५५२ शाळांमधून राबविला जातोय. या अभियानाअंतर्गतची सगळ्यात ठळक गोष्ट म्हणजे सगळ्या शाळांना एकसारखाच रंग दिल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचं रूपडं बदललं आहे. गावातल्या जुन्या पडक्या शाळांना एकसारखीच रंगसंगती केल्यामुळे त्या एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे वाटू लागल्या. त्या जणू काही एखाद्या नववधूप्रमाणे नटल्या आहेत.
शाळा परिसरात जमिनीपासून तीन फुटांपर्यंत रंग देऊन त्या भिंतींवर वेगवेगळी चित्रं, वेगवेगळी माहिती देणारा मजकूर रंगवण्यात आला. उदाहरणच द्यायचं तर सात रंग, सात वार यांची माहिती, मराठी-इंग्रजी महिन्यांची यादी भिंतींवर रंगविण्यात आली. ऋतूनुसार महिन्यांची माहिती शाळेतल्या भिंतींवर दिली गेली. वेगवेगळ्या भौगोलिक आकृत्या, रचना, नकाशे आसपासच्या भिंतींवर रंगवलं गेल्यामुळे सतत मुलांच्या डोळ्यांसमोर राहिल्यामुळे त्यांना त्याची गोडी वाटायला लागली. शाळांच्या पायऱ्यांवर पावलांचे ठसे काढून त्यात अंक रंगवले गेले. पहिली-दुसरीतल्या मुलांना हा प्रकार फारच आवडला. ते  आकडे मोजत मोजत त्या पावलांवर धावणं हा त्यांचा खेळच झाला. शाळेच्या, गावाच्या भिंतीवर गणित आणि शब्दकोडी बघून मुलांना ती सोडवावीशी वाटायला लागली. मराठी- इंग्रजी स्वर सतत डोळ्यांसमोर राहिल्यामुळे ते पाठ करण्याची मुलांना गरज पडेनाशी झाली. उंची मोजण्याच्या मोजपट्टीने मुलं आपापली उंची मोजायला लागली. नेहमी उंची मोजत राहिल्यामुळे त्यांना वाढ होणे म्हणजे काय ही संकल्पना समजायला मदत झाली. भाषेतले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बाराखडी, हे सगळं वर्गात घोकंपट्टी करत शिकण्यापेक्षा कृती फलकांवर बघत असल्यामुळे मुलांना ते शिकणं म्हणजे काही तरी अवघड अभ्यास करणं आहे, असं वाटेनासं झालं. त्यांनी आपल्या वर्गाचा, शाळेचा नकाशा तयार केला. त्यातून हळूहळू जिल्ह्य़ाचा, राज्याचा नकाशा कसा वाचायचा हे ती आपोआपच शिकली.

प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवला. गावागावांतून नागरिक आपापल्या परीने शाळा विकासासाठी पैसे देऊ लागले, तर काही जणांनी सिमेंट पोल देऊन शाळेला कंपाऊंड करा, असे सांगितले. बऱ्याच जणांनी मोफत श्रमदान केले. या अभियानाने शाळेकडे बघण्याची लोकांची मानसिकता बदलली.
शाळांचा भौतिक विकास करणे हा या अभियानाचा केवळ एकमेव उद्देश नाही. त्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रमांचे- स्पर्धाचे आयोजनदेखील केले गेले. त्यामुळे आजमितीस तांडा, वस्त्या, वाडय़ातील मुलांना स्पर्धा परीक्षा काय असतात याची माहिती झाली. मुलांना शाळेत जाणे, शिकणे मनापासून आवडायला लागले आहे.
या अभियानाने शिक्षणाच्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवला. गावागावांतून नागरिक आपापल्या परीने शाळा विकासासाठी पैसे देऊ लागले, तर काही जणांनी सिमेंट पोल देऊन शाळेला कंपाऊंड करा, असे सांगितले. बऱ्याच जणांनी मोफत श्रमदान केले. या अभियानाने शाळेकडे बघण्याची लोकांची मानसिकता बदलली. अधिक सकारात्मक केली.
शाळा उन्नती अभियानातील उपक्रम-
मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी यासाठी दर आठवडय़ाला किंवा अभ्यासक्रमांचा एक घटक शिकवून झाल्यानंर शाळा स्तरावर किमान १० गुणांची एक चाचणी घेतली जात आहे. या चाचणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला २०० पानांची वही पुरवली जाते. या चाचणीची तपासणी दर शनिवारी नियमितपणे होते. या चाचणीमुळे पहिली ते सातवीच्या मुलांची उपस्थिती वाढली आहे. त्यासोबतच मुलांना अभ्यासाची आणि शिक्षकांना नियमितपणे अध्यापनाची सवय लागली आहे. दर महिन्याला केंद्रप्रमुख स्वत: प्रश्नपत्रिका काढून २० गुणांची चाचणी घेतात. तालुका स्तरावरून गट शिक्षण अधिकारी सहामाही व वार्षिक मूल्यमापनासाठी ५० गुणांची एकाच वेळी चाचणी घेणार आहेत.
- शिष्यवृत्ती सराव परीक्षा- इयत्ता चौथी व सातवीतील मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती व्हावी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व्हावेत या हेतूने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांत खास सराव परीक्षा घेतली जाते. या माध्यमातून गुणवत्ता वाढीला चालना मिळत आहे.
जिल्ह्य़ातील सर्व शाळांतील मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माहितीसोबतच सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी इयत्ता तिसरी व सहावीच्या मुलांसाठी सर्व विषयांवर आधारित प्रत्येक विषयासाठी एक हजार प्रश्न तयार करून जिल्हा सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
जिल्ह्य़ातील शैक्षणिक गळती कमी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
गणित विषयाबाबत मुलांच्या मनात भीती राहू नये यासाठी विविध प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून गणितसमृद्धी केली जात आहे. तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या सुरुवातीला केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तर याप्रमाणे आयोजन केले जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत सर्व ठिकाणाच्या प्रश्नमंजूषा स्पर्धा पार पडल्या असून, आता जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातून आलेल्या वयोगटनिहाय मुलांची स्पर्धा होणार आहेत. त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवडण्यात येतील व त्यांना आकर्षक रोख बक्षिसेदेखील दिली जाणार आहेत. प्रश्नमंजूषा स्पर्धेमुळे गावागावातील शाळांमध्ये कौन बनेगा करोडपतीसारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे आजमितीस मुले आपल्या देशाविषयी, राज्याविषयी अधिक माहिती मिळवत आहेत.
-
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाळ्यात शाळेच्या छतावर पडणारे पाणी वाया जाऊ नये, यासाठी प्रत्येक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग झाले असून, यातून जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरवून शालेय परिसरात जास्तीत जास्त हिरवळ जोपासणी व निसर्ग संवर्धन करणे हा हेतू अपेक्षित आहे.
-
विद्यार्थ्यांना जग, भारत, महाराष्ट्र यांची भौगोलिक, राजकीय, प्राकृतिक परिपूर्ण माहिती व्हावी यासाठी पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी असे गट करून नकाशावाचन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नकाशा ओळख तर झालीच, मात्र त्यासोबतच भूगोल या विषयाची आवड निर्माण झाली.
  शाळा स्तरावर प्राप्त होणाऱ्या अनुदानातून मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेत अभ्यासक्रमातील चित्रांची रंगरंगोटी शाळेच्या भिंतीवर केली आहे. याचा उपयोग पहिली आणि दुसरीच्या मुलांना जास्तीत जास्त झालेला आढळला. कारण त्या वयात मुलांना शाळेची गोडी लावण्यासोबतच त्यांना पुस्तकी ज्ञानाची माहिती व्हावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सदर उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांविषयी मुलांमध्ये आवड निर्माण होऊन त्यांनी स्वत:हून या विषयातील नवनवीन संकल्पना हाताळाव्यात यासाठी शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास शिक्षक देत आहेत. विद्यार्थी त्यासाठी एक स्वतंत्र वही ठेवून त्यात उदाहरणे सोडवत आहेत. असेच इंग्रजी व विज्ञान विषयासाठी केले जात आहे.

                                 
आवडते मज माझी शाळा
धनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील प्राथमिक शाळेत पाचवीतील विशाल सांगतो की, मला आधी शाळेत जायला अजिबात आवडायचे नाही. रंग गेलेल्या, पडक्या भिंती असलेली शाळा अगदी जुनाट, भकास वाटायची. मात्र अचानक ऑगस्ट महिन्यात आमच्या शाळेला शिवाजी देशमुख सरांनी रंग दिला. त्यावर चित्रं काढली, गणिताची शब्दकोडी, मराठीतील इंग्रजीतील वर्णमाला काढली. आम्हाला फारच आवडलं ते. सारखी ती चित्रं, माहिती नजरेसमोर असल्यामुळे आम्हाला अभ्यास आवडायला लागला.
मंढा तालुक्यातील धोंडी पिंपळगाव येथील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणारी साक्षी सांगते की, शाळेतील भिंतीवर केलेल्या रंगकामामुळे आम्हाला शाळा आवडायला लागली. प्रश्नमंजूषा घेतल्यामुळे सामान्यज्ञान आवडायला लागलं. मी आमच्या केंद्रातून या परीक्षेत पहिली आली, तसेच तालुक्यात दुसरी आली. माझी आई खूप खूश झाली. सगळ्यांनी माझे कौतुक केले. मलासुद्धा ती परीक्षा द्यायला खूप मजा आली.
श्रीराम तांडय़ावरील पवन राजेश चव्हाण हा पाचवीतील मुलगा सांगतो की, आम्हाला नकाशाचे प्रकार, नकाशा कशा पकडावा, नकाशा कसा वाचावा, दिशांची नावे, देशांच्या राजधान्या या सगळ्याची माहिती नकाशावाचन या उपक्रमामुळे मिळाली. माझे आई-वडील निरक्षर आहेत. मी हे सगळं शिकलो, तालुक्यात जाऊन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा दिली याचा माझ्या आई-वडिलांना फार अभिमान वाटला.
शाळा उन्नती अभियानात काय आहे?
-
सर्व जिल्हा परिषद शाळांना सारखाच रंग दिला गेला. त्यामुळे एकसंधता आली.
-
जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या शाळांतील प्रत्येक वर्गात अध्ययन अनुभव देणारे सारखेच तक्ते आहेत.
-
प्रत्येक पायरीवर पावलांच्या ठशांत १ ते १० अंक रंगवले गेले आहेत. पहिलीतील मुले आवडीने हे अंक वाचतात.
-
अभियानामुळे लोकसहभाग वाढला. त्यामुळे शिक्षक वेळेवर शाळेत जायला लागले. शिक्षकांच्या अनुपस्थितीबद्दलच्या, उशिरा येण्याबद्दलच्या तक्रारी कमी झाल्या.
-
अभियानात १५५६ शाळा सहभागी झाल्या आहेत.


अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
सुरुवातीला सिंधी काळेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर शाळा उन्नत अभियान राबवायचे ठरले. हा उपक्रम राबवणारे सिंधी काळेगाव येथील केंद्रीय मुख्याध्यापक आर. एम. बोर्डे सांगतात, आम्ही एकवीस दिवसांत अकरा शाळा मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांना अपेक्षित होत्या तशा केल्या. त्यांनी जिल्ह्य़ातील सर्व केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांना एक दिवस या शाळा पाहायला लावल्या आणि नंतर हा उपक्रम जिल्हाभरात राबविला. मी विद्यार्थ्यांसाठी वाचनकक्ष तयार केला. दुपारच्या वेळात मुले या ठिकाणी अभ्यासात रमतात. या अभियानामुळे शालेय वातावरण बदलून गेले आहे. वारंवार शैक्षणिक माहिती डोळ्यासमोर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना ती लवकर आत्मसात होत आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता वाढली असून, शिक्षक अधिक जोमाने काम करत आहेत.
डोंगराच्या कुशीत असलेल्या माझ्या श्रीराम तांडय़ावर शिक्षणाची गंगा तशी फार उशिरा आली. आमच्या दृष्टीने जगायचं म्हणजे राब राब राबायचं आणि मुलाबाळांना खाऊ घालायचं. मात्र जगदीश कुडे व एन. जी. पठाण हे दोन मास्तर शाळेत आले  आणि आमच्या मुलांचं भाग्यच बदललं. तांडय़ावरची जी मुले उनाडक्या करत फिरायची, त्यांना दोघांनी शाळेची गोडी लावली. त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली. त्यातच शाळा उन्नती अभियान आले आणि आमची बंजारा भाषा बोलणारी मुलं या अभियानातील विविध उपक्रमामुळे शाळेत जायला लागली, शाळेच्या भिंतींवर काय लिहिलंय ते तांडय़ातील निरक्षर माणसांना सांगायला लागली. शाळा उन्नती अभियानामुळे आमच्या तांडय़ातील मुलांसाठी शिक्षणाची पहाट उगवली आहे. हे उद्गार आहेत ज्या गावात जायला रस्तासुद्धा नाही अशा श्रीराम तांडा गावच्या कृष्णा उत्तम राठोड यांचे!
गणेशपूर (ता. परतूर) येथील प्रफुल्ल सोनवणे या शिक्षकाने सबंध गावच शिक्षणमय करून टाकले आहे. ते सांगतात, शाळेत मुले शिक्षकाजवळ केवळ सहा तास असतात. यामुळे त्यांना द्यायला हवं तेवढं ज्ञान देता येत नाही. त्यामुळे मग मी गावातून वर्गणी गोळा केली, माझ्या खिशातून पैसे टाकून तीनशे लिटर रंग आणला. गावातल्या प्रत्येक भिंतीला रंग दिला. त्यावर भाषा, गणित, इंग्रजी या विषयांमधले वेगवेगळे घटक उतरवून काढले. त्यामुळे गावात मुलं कुठेही गेली तरी वेगवेगळ्या विषयांमधील माहिती मुलांच्या डोळ्यासमोर राहायला लागली. गावातल्या कुठल्याही भिंतीवर त्यांच्यासाठी ज्ञान उपलब्ध झाले आहे. लहान इयत्तेतल्या मुलांनाही वरच्या इयत्तेतली माहिती आपोआपच समजायला लागली आहे. थोर संतांची, महात्म्यांची माहिती आजमितीस माझ्या शाळेतील दुसरीची मुले सांगतायेत.
प्रफुल्ल सोनवणे यांनी आतापर्यंत २५० मुलांना दत्तक घेतले असून, त्यांना वर्षभर लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य ते स्वखर्चातून देतात.
अंबड तालुक्यातील पिठोरी येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक एस. एम. चोले आणि शिक्षक आर. टी. कदम सांगतात आम्ही मुलांसाठी शाळा म्हणजे बगीचा केला आहे. मुलांना बागेत खेळायला, बागडायला आवडते. त्याच प्रकारचे वातावरण आम्ही शाळेत निर्माण केले आहे. शाळा उन्नती अभियानांतर्गत आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानात इंग्रजी, मराठी वर्णमाला सिमेंटने रंगवून काढून थ्री डायमेंशनमध्ये सादर केल्यामुळे मुले त्याकडे जास्त आकर्षक झाली आहेत. गणितातील किचकट अपूर्णाक सममिती भिंतीवर उतरविल्यामुळे मुले चालता-बोलता ती अभ्यासायला लागली. इमारतीच्या छतावर आकाशगंगा अवतरली असून, त्यामुळे मुलांना नावीन्यपूर्ण गोष्टी चित्रातून माहिती झाल्या आहेत.
डॉट बोर्डाच्या आधारे मुले आपापल्या समवयस्कांकडून अनेक बाबी समजून घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणाऱ्या संत तुकाराम रंगमंचावर १ ते १० अंकांची ओळख करून देणारे पावलांचे ठसे आहेत. मुलांना घसरगुंडीवर चढता-उतरता क्रम लिहून दिल्यामुळे मुले तो आनंदाने अभ्यासत आहेत. आवार भिंतीवर श्लोक, इंग्रजी लिपीतील सुविचारांमुळे मुलांना वाचनाची आवड लागली आहे. तसेच मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आम्ही आठवडा बाजारातील भाजीपाला स्टॉल शाळेत लावले. मुलांनी शाळेतच भाजीपाला विक्री करावी आणि त्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार ज्ञान मिळावे हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. या गावातील राजेश्वर पास्टे नावाचे पालक या सगळ्या बदलाबाबत सांगतात, ‘शाळा लै भारी झाली.
अंबड तालुक्यातील आवा येथील प्रकाश गाताडे व संजय थोरात या दोघांनी शाळा उन्नती अभियानातील सर्व उपक्रमांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली. त्यासोबतच त्यांनी शिक्षकांनी मुलांना शिक्षा करू नये व मुलांनाच स्वयंशिस्त लागावी, यासाठी बालन्यायालयस्थापन कले. आठवडय़ाच्या प्रत्येक शुक्रवारी ते भरते. त्यात न्यायाधीश, सरकारी, तसेच खासगी वकील या भूमिका मुलेच पार पाडतात. न्यायाधीश मुलगा न्यायनिवाडा करून संबंधित मुलाला शाळेतील कचरा उचलणे, झाडांना पाणी टाकणे, गवत काढणे अशा शिक्षा सुचवतो. त्यातून मुलांना शिस्त लागली आणि त्यांना न्यायालयीन कामकाजाची माहितीदेखील झाली.
अंबड तालुक्यातील उर्दू माध्यमात शिकविणारे सलीम नवाज जाफराबादी सांगतात, उर्दू माध्यमातील मुलांसाठी हे अभियान खूपच उपयुक्त ठरले आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणी मुलांना उर्दूतून संदर्भपुस्तिका फारशा मिळत नाहीत. या अभियानाअंतर्गत उर्दूतून विविध प्रकारचे विचार, तक्ते लिहिल्यामुळे मुले आवडीने ते वाचताना दिसत आहेत.
मंठा तालुक्यातील हेळसवाडी येथील शाळेतील शिक्षक विनायक राठोड सांगतात की, या कामातून मला आनंद मिळाला. नवनवीन माहिती शिकण्याचा स्रोत मिळाला.
परतूर तालुक्यातील दत्तात्रय हेलसकर हे शिक्षक सांगतात की, शिक्षणाच्या प्रवाहात नवचैतन्य निर्माण आणण्याचे काम या अभियानाने केले आहे. प्रत्येक वर्गाला त्यानुरूप अध्ययन अनुभव मिळत असल्यामुळे मुलांच्या शिकण्यात, आकलनात फरक पडला आहे, मुले हुशार झाली आहेत.
जाफराबाद तालुक्यातील निमखेडा खुर्द येथील अनिल सोनूने या शिक्षकाने आपल्या वर्गात स्क्रीन बसवला आणि त्यानुरूप तो अध्यापन करतो. यामुळे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत नावीन्य आले आहे.
जाफराबाद तालुक्यातील डावरगावदेवी येथील शिक्षक जमीर शेख गेली वीस वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. ते या अभियानाबाबत बोलताना म्हणतात, या अभियानाने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या अंगच्या कलागुणांना वाव दिला तसेच त्यांच्यातील मरगळ झटकून काढली. यात काही शिक्षकांनी आपापल्या कल्पकतेने शाळा उन्नती अभियानातील घटकांसोबतच नवीन घटकांचा समावेश करून विद्यार्थ्यांना एखादा घटक अधिक सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक झपाटल्यागत काम करायला लागले आहेत. मुलेसुद्धा शिक्षकांना वेगवेगळे प्रश्न विचारायला लागली आहेत. त्यामुळे शिक्षकांना आपले ज्ञान सतत अद्ययावत करावे लागत आहे. माझ्याच शाळेत मी हे अनुभवतो आहे. दुपारच्या शालेय पोषण आहार वाटपावेळी माझ्या शाळेतील मुले रांगेत उभी असतात आणि समोरच्या भिंतीवरील लिहिलेली वाक्ये वाचून मला अनेक प्रश्न विचारतात. या अभियानाने शिक्षक गतिशील झाले आहे आणि विद्यार्थी ज्ञानोपासना करताना दिसत आहेत.
धोंडीपिंपळगाव येथील प्राथमिक शाळेतील तरुण शिक्षक राजीव हजारे सांगतात की, स्पेशलायझेशनच्या या जमान्यात कौशल्यांना अधिक महत्त्व आहे. हे लक्षात घेऊनच हे अभियान आखले गेले आहे. त्याच्या परिणामी मुले स्वत: ज्ञाननिर्मिती करायला लागली आहेत. ती प्रश्नमंजूषा तसेच इतरही उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानक्षेत्रांकडे वळत आहेत. या अभियानाने जिल्हा परिषद शाळांमध्ये एकसंधपणा आला आहे. या अभियानामुळे मी माझ्या शाळेत पाण्यासाठी बोअर घेतला. ग्रामपंचायतीने आम्हाला विद्युतपंप दिला. यामुळे या दुष्काळातदेखील दिवसभरात पाच तास मोटार चालते. त्यामुळे शाळेतील मुलांची तसेच गावकऱ्यांची पाण्याची सोय झाली आहे.
जाफ्राबाद तालुक्यातील पोखरी येथील प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबनराव पाचरणे सांगतात, आमच्या मुलांना शाळेत जायला जराही आवडायचे नाही. शाळा अगदी निरस होती. शाळेत केवळ घाण असायची. मुलं शाळेत जायला कंटाळा करायची. मात्र येथे राजेंद्र कणखर गुरुजी आले. त्यांनी गावातून चाळीस हजार रुपये लोकवर्गणी केली व त्यातून बोअर घेऊन शाळेत सुंदर बगीचा तयार केला. शाळा उन्नती अभियानांतर्गत उपक्रम सुरू झाले आणि आमची मुले झपाटय़ाने वाचायला, लिहायला लागली. शाळेचा परिसर जिवंत झाला. मुले गावात चकरा मारण्याऐवजी शाळेकडे चक्कर मारतात आणि भिंतीवरील मजकुराचे वाचन करतात. आधी आम्हाला गावातून खूप विरोध झाला. मात्र कणखर सरांच्या प्रयत्नांमुळे आम्ही आमच्या शाळेचा विकास करू शकलो.
जालना जिल्ह्य़ातील अंदमान-निकोबार समजल्या जाणाऱ्या जाफराबाद तालुक्यातल्या बेलोरा येथे एच. यू. रमघम यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गरम्य शाळा तयार झाली आहे. ते सांगतात की, आम्ही गावात लोकवर्गणीची मागणी केली. गावातील लोकांनी एकाच दिवसात ४० हजार रुपये दिले. त्यातून आम्ही शाळेसाठी दहा हजार लिटर पाण्याची सिमेंट काँक्रीटची टाकी बांधली, तसेच शाळेला भव्य लोखंडी कमान बसविली आहे. एक कि.मी. अंतरावरून शाळेत पाइपलाइन आणली. या वेळी ग्रामस्थांनी श्रमदान मोफत केले. यामुळे आम्ही शाळेतील दोन हजार लहान-मोठे वृक्ष जतन करत आहोत. हे केवळ शाळा उन्नत अभियानामुळेच होऊ शकले.
जालना तालुक्यातील उषा मुंडे या शिक्षिका सांगतात की, हे अभियान म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे आहे. नवनवीन ज्ञाननिर्मितीसाठी आम्ही शिक्षक मंडळी यामुळे उद्युक्त झालो असून, आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. शिक्षक आता वाचन करूनच वर्गात प्रवेश करताना दिसत आहेत. शिक्षकांची कार्यप्रवणता वाढली तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्तादेखील या अभियानामुळे वाढली आहे.
जाफ्राबाद तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक शाळेतील संजयकुमार निकम सांगतात या अभियानामुळे आम्ही शाळा जिवंत केल्या. अठराशे लोकसंख्या असलेल्या या गावात आम्ही लोकांचा इंग्रजी माध्यमाकडचा कल मराठीकडे वळवला. त्यानुरूप शाळेत उपयुक्त शैक्षणिक साहित्य तयार केले. शाळा उन्नती अभियानातून आम्ही संगणक शिक्षण देत आहोत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगासाठी तयार होत आहेत. आम्ही गावातून तीस हजार लोकवर्गणी गोळा केली आणि शाळेचा कायापालट केला.
भोकरदन तालुक्यातील जयंत कुलकर्णी सांगतात या अभियानाने गाव-शाळा संबंध अधिक घनिष्ठ झाले. गावातील नागरिक माझी शाळा या भावनेने तिच्याकडे पाहात आहेत.
बदनापूर येथील राजेंद्र जत्ती यांनी आपल्या शाळेत इंटरकॉन्फरन्स सिस्टीमद्वारे अध्ययन-अध्यापन सुरू केले जाते. यासाठी त्यांनी एक मुख्य खोलीतून प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम बसवली आहे. यामुळे ज्या वर्गात शिक्षक नसतील अशा वर्गातही मुलांना धडे देता येतात. त्यांनी नवीन खोली बांधकामासाठी आलेल्या एका रूमला इअछअ (Building as learning Aids) इलेमेंटचा परिपूर्ण उपयोग केला आहे. तिला लावण्यात आलेल्या ग्रिलला विविध भौमितिक आकृत्यांचा आकार दिलेला आहे. त्यामुळे मुले ते आवर्जून पाहतात. या अभियानांतर्गत पिण्याच्या पाण्याची आठ नळाद्वारे त्यांनी व्यवस्था केली आहे.

                      शाळा उन्नती अभियान PDF डाऊनलोड करा











No comments:

Post a Comment